एकदा शिरोडे गावात मोटारी भरून शेकडो पोलीस आले. हाती लाठ्याकाठ्या आणि बंदुका. गोरे सार्जंट आले. ते कानपटात मारून गांधीटोप्या उडवू लागले. मिठागरां- भोवती कडेकोट पहारा पडला. सगळा गाव भीतीनं चेपल्यासारखा झाला. पण गांधी टोपी वाले चेपत नव्हते. दबत नव्हते. ते धुंदीनं ' लेंगे स्वराज्य लेंगे' गात होते. "महात्मा गांधी की जय " म्हणत होते.
सत्याग्रहाचा दिवस उजाडला. काही गावकरी भीतीनं घरात लपून बसले. काही धीर करून गंमत बघायला गेले. गांधीटोप्या बगळ्यांच्या थव्यासारख्या येत होत्या. पोलिसांची कडी तोडत होत्या. मिठागरांवर झंजावाती झेप घेत होत्या. दणादण लाठ्या बसत होत्या. पण मुठीतलं मीठ सुटत नव्हतं.
कितीतरी गांधीटोपीवाले जखमी झाले. घायाळ होऊन पडले. त्यांना उचलण्यासाठी गावकरी नकळत पुढे धावले. काही जण त्यांच्यासाठी गूळ आणि पाणी घेऊन आले. आणि मग हळूहळू गावातलं वातावरण नकळत बदलू लागलं. चहाच्या दुकानात गांधीटोपीच्या शौर्याच्या कथा ऐकू येऊ लागल्या.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
2 वर्षांपूर्वीसुंदर लेख.
Dr. Vivek Korade
2 वर्षांपूर्वीमूठभर मिठाची ताकत स्पष्ट करणारा सुंदर लेख
Prathamesh Kale
2 वर्षांपूर्वीकमाल लेख ...
Yogesh Tadwalkar
2 वर्षांपूर्वीवाह!
atmaram jagdale
2 वर्षांपूर्वीछान लेखन -