भाषाविचार - इंटरनॅशनल शाळांचं फॅड आणि प्रादेशिक भाषा (भाग-५)


"आपल्याला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटतं याचा विचार पालक अधिक करतात. एकेकाळी मराठी शाळांमध्ये इंग्रजी चांगलं न शिकवल्यानं आपण मागे पडलो. पण आता इंटरनॅशनल शाळांनी आपल्या मुलांच्या पिढीत हा अनुशेष वेगाने भरून निघेल असं पालकांना वाटतं. त्यांच्या मनातली खरी-खोटी भीती त्यांना इंग्रजीशरण बनवते. त्यांच्या या मानसिक गुलामगिरीचा फायदा इंग्रजी शाळा घेतात. इंटरनॅशनल शाळा या भाजणीतल्या सर्वोच्च स्तरावर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडचं शोषण सर्वाधिक आहे. ‘गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील’ असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. इंग्रजी शाळांचे गुलाम मात्र गुलामगिरीची जाणीव झाली किंवा करून दिली गेली तरी अधिक निष्ठेने इंग्रजी शाळांची गुलामगिरी करत राहतात. हा डोलारा कसा कोसळवायचा हाच खरा प्रश्न आहे." 'भाषाविचार' सदरातून इंग्रजी शाळांच्या वर्चस्वाबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार - 

------------------------------------------------------

देशभरामध्ये प्रादेशिक भाषांच्या शाळांना आणि एकूणच प्रादेशिक भाषांना वाईट दिवस आल्याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रादेशिक भाषांतल्या शाळांची संख्या घटणं आणि इंग्रजी माध्यमाच्या कुत्र्यांच्या छत्र्या गल्लोगल्ली उगवणं. देशी भाषांमधून चांगलं शिक्षण मिळत नाही, इथल्या शिक्षणाने नोकरी आणि उद्योगाची कवाडं खुली होत नाहीत असा कांगावा पहिल्यांदा समाजाच्या मध्यम आणि उच्च मध्यम वर् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , शाळेचे माध्यम

प्रतिक्रिया

  1. Gaurav Jagtap

      4 वर्षांपूर्वी

    मराठी माध्यमाच्या शाळा न निवडण्याचे एक कारण म्हणजे चांगल्या शिक्षकांचा अभाव. पैसे भरले की शिक्षक होता येत हा एक प्रकार आणि दुसर की जुने नवे फार थोडे शिक्षक प्रयोगशील आहेत. ते बऱ्याचदा पाट्या टाकायचे काम करतात. शिक्षकवर्ग हा शाळेचा ब्रँड ॲम्बेसेडर असावा.

  2. nilambari

      4 वर्षांपूर्वी

    लेखकाने अतिशय परखडपणे सत्य विचार मांडले आहेत.

  3. rsanjay96

      4 वर्षांपूर्वी

    लेख उत्तम आहे. इंग्रजी भाषा शिक्षण हे ऐकेकाळी मराठी माध्यमातून चांगले होते. यात मराठीचा पाया तयार होताना इंग्रजी मराठीतून समजण्याची प्रक्रिया पार पडत होती. आमची पिढीने मराठी आणि इंग्रजीचे अध्ययन याच पध्दतीने केलेले होते. यात ही चांगले वैद्यक, अभियंते ,शास्त्रज्ञ हे तयार झाले आहेत. आजची इंग्रजी शिक्षण व्यवस्था आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय स्कूल, सीबीएससी शाळा ही केवळ दुकानदारी झाली आहे. नव्वदनंतर मध्यमवर्गीय यास पूर्ण शरण गेले आहेत. या शरणजाण्यात अगतिकता अधिक दिसते.हजारो रुपये शाळांची फी भरणारा मध्यमवर्ग हा वर्तमानपत्रे आणि पुस्तकांवर पाचशे रूपये खर्च करत नाही. हा वर्ग स्वतः ला बुद्धिजीवी समजतो हा मोठा दांभिकपणा आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen